My Blog List

Wednesday 13 December 2017

चिनी वस्तू व आपले देशप्रेम 14/07/17

चिनी_वस्तू_व_आपण...
संदिप रामचंद्र चव्हाण.
14 जुलै 2027

इंग्रजांच्या प्रदिर्घ काळच्या सत्तेच्या जोखडातून, असंख्य क्रांतिकारकांच्या रक्तातुन, अनेक देशवासीयांच्या त्यागातुन आपल्या देशाला १५ऑगस्ट१९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुतेक सर्व जनतेचे एक समान ध्येय होते...देशाला स्वतंत्र करायचे...
देश स्वतंत्र झाला...राजकीय गुलामगिरीतून मुक्त झाला...हळू हळू साक्षर व सक्षम झाला...प्रगतीचे, विकासाचे वारे सर्वत्र वाहु लागले. तंत्रज्ञान घराघरात जाऊन पोचले ....पण हे सर्व होताना बहुसंख्य लोक मानसिक गुलामगिरी विसरले नाहीत किंवा वंश परंपरागत ती पुढल्या पिढीत जशी आहे तशी किंवा जास्तच रुजत गेली.
जेजे परकीय तेते चांगले व भारतीय, स्वदेशी ते टाकाऊ अशी विचारसरणी असणारी जमात या देशात तयार झाली. आज देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पिढीतील लोक हयात नाहीत, असले तरी हाताच्या बोटावर मोजण्याइतप्त असतील. आज जी पिढी तरुण आहे त्यांना हे स्वातंत्र्य कोणत्याही त्यागाशिवाय, कष्टाशिवाय मिळाले आहे. त्यामुळेच कदाचित त्यांना त्याचे मोल वाटेनासे झाले आहे...
देशात आज जी चिनी वस्तुंची रेलचेल व त्या खरेदी करण्यावर तुटून पडलेले भारतीय पाहता..चर्चिलच्या वाक्याची आठवण झाल्याशिवास राहत नाही. भारताला सातंत्र्य देताना चर्चिल बोलला होता...अरे यांना स्वातंत्र्य देऊ नका, हे त्या योग्यतेचे नाहीत...ही फक्त मोठी लोकसंख्या आहे...राष्ट्र नव्हे. India is not a nation, it is huge population.
(“Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low caliber & men of straw. They will have sweet tongues & silly hearts. They will fight amongst themselves for power & India will be lost in political squabbles. A day would come when even air & water would be taxed in India”.
अर्थात--“सत्ता धूर्तों, दुष्टों और बदमाशों के हाथों में जाएगी, भारत के सभी नेता कम क्षमता और सूखी घास जैसे लोग हैं। इनके पास मीठी जुबान और मूर्खता भरे दिल हैं। ये सत्ता के लिए आपस में लड़ेंगे और भारत राजनैतिक झगड़ों में फँस जायेगा। एक दिन ऐसा भी आ सकता है जब भारत में हवा और पानी पर भी टैक्स लगाया जायेगा।”..संग्रहित)
आज देशाच्या स्वातंत्र्याच्या सत्तरीत चर्चिल द्रष्टापुरुष होता असं वाटल्यास चुकीचं नाही... त्याच विधान आपण भारतीयांनी खर करुन दाखवलं, असच म्हणावं लागेल. खोटा राष्ट्राभिमान, जातीपातीच्या लढाया, धर्मांधता, सर्वत्र प्रचंड प्रमाणावर बोकाळलेला भ्रष्टाचार, हे त्याचेच उदाहरण आहे.
भारत देशाने १९९१ ला आर्थिक उदारीकरण स्वीकारले व आपल्या देशात इतर सर्व देशांना व्यापारासाठी दारे खुली झाली. सर्व देशांना भारत देश म्हणजे मोठा ग्राहक वाटू लागला. मग वेगवेगळ्या पध्द्तीने जो तो देश आपापल्या मालाची जाहिरात करुन भारतीयांच्या मनावर आमचेच प्रॉडक्ट्स कशी चांगली आहेत हे बिंबवू लागला..मग कधी नव्हे ते भारतीय तरुणी मिस वल्ड होऊ लागल्या...मग दरवर्षी भारतीय तरुणीची निवड जगातील सर्वात सुंदर व हुशार तरुणी म्हणुन व्हायला लागली...हे प्रमाण काही वर्षे इतके वाढले की जगातील इतर देशांच्या तरुणींची सुंदरता लोप पावली का काय? असा प्रश्न निर्माण व्हावा. मग क्रिकेटला आलेले गँम्लर त्यातील खेळाडूंचा व बॉलिवूड मधील नट नट्यांचा जाहिरातीत केलेला उपयोग व बिनडोक भारतीयांनी त्यांना डोक्यावर घेऊन देशहितला दिलेली तिलांजली हा सगळा विकसित राष्ट्रांनी रचलेला सापळा होता व त्यात आपण अलगद फसत गेलो.
बहुतेक विकसित देशांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली. पण सर्वात चिंतेचा विषय बनला तो म्हणजे चीन व चिनी वस्तूंचा...
चीन हा भरतदेशाचा क्रमांक एकचा शत्रू आहे. पाकिस्तान क्रमांक दोन. हिंदी चिनी भाई भाई करत गळ्यात हात टाकून टांगड्यात पाय घालण्याची चिनी प्रवृत्ती लक्षात घेता...चीन हाच देशाच्या प्रगतीला खोडा आहे हे सर्वांनी ध्यानी, मनी, स्वप्नी लक्षात ठेवले पाहिजे..पाकिस्तान हे प्यादे आहे..त्यांचेच खायचे वांदे आहेत...त्यामुळे चीन हाच क्रमांक एकचा शत्रू आहे.
चीनकडुन आपण मोठ्या ऊर्जा प्रकल्पांपासून ते अगदी छोट्या पिनां, गणेशमूर्ती, देवांची चित्रं, फटाके, राख्या, आकाशकंदील, रांगोळी, कपडे, वॉटर प्युरिफायर, गॅस गीझर, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, इलेक्ट्रिकच्या आकर्षक माळा, इलेक्ट्रिकच्या अनेक वस्तू, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, कीबोर्ड, मेमरी स्टोरेज डिव्हाइस, घरातील फेंगशुई वस्तू, खते, एवढेच नव्हे तर टीबी आणि कुष्ठरोगावरची औषधे, अँटिबायोटिक्स, मुलांची खेळणी,रंगीबेरंगी बाहुल्या, बॅटबॉल, चावीची खेळणी, टेडीबेअर, सेट टॉप बॉक्सेस, टीव्हीचे सुटे भाग आणि बरेच काही आपण चीनकडून आयात करतो. लहान मुलांच्या खेळण्यातील मार्केट मध्ये खुप मोठ्या प्रमाणावर चिनी खेळणी आहेत.
आपण चीनकडून जे आयात करतो, त्या वस्तू भारतात बनत नाहीत का? नक्कीच बनतात. पण तुलनेने महाग असतात. चीन या वस्तू अत्यंत कमी खर्चात उत्पादन करून भारताला विकतो.
चिनी वस्तू या लघु उद्योगांतून बनविल्या जातात.  चिनी स्त्रिया या वस्तू घरी बनवतात. त्यामुळे त्यांची किंमत अत्यंत कमी आहे. आपल्याकडे असे घरगुती रोजगार नाहीत. या वस्तू तुम्हीआम्ही घेता कामा नये, हे सांगणे पटतेही. परंतु, स्वस्त वस्तूंचे आकर्षण असणाऱ्या भारतीय ग्राहकाच्या हे कसे गळी उतरावायचे?
आपण रोज वर्तमानपत्रात चिनी फोनच्या जाहिराती पाहतो...मोठमोठे डिजिटल बोर्ड पाहतो..प्रसारमाध्यमे सुद्धा पैसा कमण्यासाठी बातम्यापेक्षा जाहिरातीवर भर देतात. जो तो पैसा कमावणे व पैसा वाचवणे याचाच विचार करत असल्यामुळे देशहिताचा अविचार कोणाला परवडेल??चायनीज पदार्थ खाऊन खाऊन बुद्धी जर चीन हितचिंतकाची झाली व त्यांच्या प्रगतीचे ढोल वाजवू लागली तर नवल ते काय?
चिनी माल स्वस्तात मिळतो म्हणून भराभर घेतला जातो. चिनी माल स्वस्त असतो, पण मस्त नसतो. म्हणजे त्याची LIFE कमी असते...तरीही घेतला जातो. युज अँड थ्रो ही मानसिकता वस्तु पासून नात्यांपर्यंत वाढत गेली आहे त्याचा परीणाम देशाच्या पर्यावरणावर व मानवी संबंधावर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
सरकार काही कारणाने किंवा जागतिक दबावामुळे थेट चिनी वस्तुवर आयात निर्बंध लादू शकत नाही...पण मोठ्या प्रमाणावर आयतकर लावल्यास चिनी वस्तू महाग होतील. त्याच प्रमाणे चीन वरुन खेळणी, फटाके, शो च्या वस्तु, लेडीज पर्स, परफ्यूम, कपडे इत्यादी की ज्याच्या ओरीजनल बिलाची मागणी ग्राहक करत नाहीत त्या वस्तू कंटेनरच्या कंटेनर भरून दोन नंबर मार्गाने भारतात येतात, यात देशाचा कर चुकवला जातो...अशा कृत्यात पोर्टट्रस्ट मधील अधीकारी, कस्टम ऑफिसर, मोठे व्यापारी यांची साखळी असते. यांना हुडकून कठोर कारवाही करणे गरजेचे आहे.
कोणताही बदल किंवा क्रांती सर्वसामान्य जनता करते...प्रस्थापीताकडून किंवा राज्यकर्त्याकडून देशहितापेक्षा स्वहिताला,पक्षहीतला जास्त प्राधान्य दिले जाते...सहाजिकच जबाबदारी सामान्यजनावरच पडते...त्यांनी दुर्लक्ष केलं की मग गुलामगिरीकडे वाटचाल नक्की होते.
चिनी वस्तुवर बहिष्कार टाकणे हे सर्वसामान्यांच्या हातात आहे. सर्वच वस्तुवर हे शक्य नसले तरी बऱ्याच वस्तुवर बहिष्कार हे ब्रम्हास्त्र वापरले जाणे काळाची गरज आहे. या बद्दलच्या प्रचार प्रसाराची जबाबदारी समाजसेवी संस्था, देशप्रेमी संघटना, प्रसार माध्यमे यांनी उचलायला हवी. जातीवाद, फुकाचे धर्मप्रेम व खोटे देशप्रेम उपयोगी नाही. चालू काळात व सध्यस्थीतीत राष्ट्रहिताच्या गोष्टीला प्राथमिकता देने गरजेचे आहे...व हे देशप्रमाचे बाळकडू घराघरातून व शाळाशाळातून देने गरजेचे आहे. यासाठी अवघा समाज जागृत होणे जरुरी आहे.
आपण जे काम करतोय ते पूर्ण क्षमतेने करु. प्रत्येकाचा थोडाथोडा हातभार एकूणच प्रगतीला कारणीभूत ठरत असतो. आपल्या कामाने काय फरक पडणार आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर हा आपला गैरसमज आहे. आपल्या सर्वांच काम करणं हि आपलीच नाही तर आपल्या देशाची गरज आहे. आणि हे आपण जेवढं लवकर लक्षात घेऊ तेवढं लवकर आपला देश प्रगतीची शिखरे पार करील.*
आपणही या चीनी माल बहिष्कार मध्ये खारीचा वाटा उचलून हे काम जमेल तसे करत राहूया... बोलणे जाते विरुनी अमर राहे सत्कृती हे संत वचन मनी धरुन कृतीला सुरवात करुया.

No comments:

Post a Comment