My Blog List

Friday 15 December 2017

क्रांतिसूर्य... मला आवडलेले मराठी पुस्तक 15/10/17

अभिमान आहे ज्यांचा असे "क्रांतिसूर्य".......
संदिप रामचंद्र चव्हाण.
15 ऑक्टोंबर 2017
छत्रपतींच्या शौर्याने पावन झालेल्या साताऱ्यात, इंग्रजांची घमेंड उतरवणारा सिंह जन्म घेतो...गनिमी काव्याने गोऱ्याना जेरीस आणुन, प्रतिसरकार स्थापन करतो, व आमच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही अस्थ होत नाही...अशी शेखी मिरवणाऱ्या इंग्रजांचे गर्वहरण करतो... क्रांतिकारकांचे मेरूमनी क्रांतिसिंह नाना पाटील यांची विश्वास पाटील लिखित क्रांतिसूर्य चरित्रात्मक कादंबरी नुकतीच वाचली... त्या बद्दल थोडंस...

गरीब शेतकऱ्याच्या घरी जन्म घेणारे नाना आताचे सातारा व सांगली व तेव्हाचा फक्त सातारा जिल्हा असणाऱ्या येडेमच्छिंद्र गावचे.  आपलं पोरगं शिकुन तलाठी बनावं, व आपल्या घरदारातील दारिद्र्याच्या अंधकारातून मुक्ती मिळावी असं स्वप्न बाळगणारे नानांचे आई, वडील व आजी यांचा नानांच्यावर खूप जीव असतो.
नाना लहानपणापासून खोडकर व आडदांड स्वभावाचे, हाडापिंडाने एकदम मजबूत, तालमीची आवड असणारे...गरिबीचे चटके सोसत कसेबसे सातवी होऊन तलाठी बनतात...पण त्यांचे मन सत्यशोधकी चळवळीत रमलेलं असत...सुरवातीला सरकारी नोकरी करून सत्यशोधक चळवळीचे काम करायचे...मोठं घरदार, हुंडा नाकारून साध्या पध्द्तीने लग्न केरतात...1925 च्या काळात बायकोला शिकवायचा हट्ट केला...घरच्यांचा विरोध पत्करला...पण पत्नीला लिहायला वाचायला शिकवले.
गांधींच्या काँगेसचे आकर्षण वाटून गावोगाव काँग्रेसचा प्रचार प्रसार चालू केला...साहेबाला हे रुचले नाही... मुलकी पाटलाने शेतसारा उशिरा भरला त्याचा ठपका नानांच्यावर ठेऊन नानांना सस्पेंड केलं...नोकरी गेली त्याच दुःख नव्हतं नानांना, पण चारित्र्यावर चोरीचा डाग लागला त्याने नानांचे हृदय तिळतीळ तुटलं.
तुरुंगवास झाला...गावकरी येड्याचा येडा चोर म्हणून हिनवु लागले...
काँग्रेसच्या तिसच्या आंदोलनावेळी पुन्हा येरवडा वारी झाली...बेचाळीसपर्यंत सर्व मिळून एकूण दहा वर्षे सजा भोगली...पेरॉल वर असताना इस्लापुरला दोन वेळा हजेरी द्यावी लागे... पोटापाण्यासाठी हमाली केली...कपडे नाहीत म्हणून गोणपाट पोत्याची कपडे सुतळीने शिवून घातली...लोक #पोतेबुवा म्हणून टिंगल करू लागले...पण नाना मात्र चळवळीचं काम करतच होते...स्वताच स्वतःच्या सभेची दवंडी द्यायचे...लोक वेडा आला म्हणून चिडवायचे...
एकदा नोकरी गेल्यावर नानांच्या देशकार्याच्या कामाला आता अडथळा नव्हता...अमोघ वक्तृत्वाने नाना गावोगावी फिरून शेतकरी, कष्टकर्यांना जागे करू लागले. तासगावच्या कचेरीवरी युनियन जॅक उतरून #तिरंगा फडकवला, वडूज, इस्लामपूर व इतर ठिकाणी आंदोलनावेळी इंग्रजांच्या फायरिंगमध्ये नानांचे साथीदार हुतात्मा झाले... गांधीगिरीने चाललेल्या आंदोलनावर गोऱ्यानी गोळ्या चालवल्या...मधल्या काळात गावगुंड व गोऱ्यानी मिळून नानांच्या घरावर जप्ती आणली...घरदार, जमीन जप्त केली...मुलगी, पत्नी, आई, वडील, भाऊ सर्वांना गावातून हाकलून दिले....मग मात्र नानांनी हातात तलवार घेऊन गावगुंडांचा बंदोबस्त केला.... पुढे पत्नी गेली, वडीलही गेले..पण नानांना त्यांच्या अत्यविधील जाता आलं नाही...इंग्रजांनी त्यांच्यावर पकड वॊरन्ट काढले...आता नाना सापडतील अशी योजना इंग्रजांनी बनवली...पण नाना वडिलांच्या उत्तरकार्यला येऊन, गोर्यांच्या हातावर तुरी देऊन पळाले...
करो या मरो या आंदोलनात नुसतच मरो हे नानांना मान्य नव्हतं... गोळ्या पेरल्या तर गोळ्याचं उगवतील हा शेतकरी बाणा घेऊन हाती बंदूक धरली...#तुफान_सेना स्थापन केली...#जीडी_बापू_लाड, #क्रांतिवीर_नागनाथअण्णा_नायकवडी अश्या जिवाभावाच्या साथीदारांनी साथ दिली, तुफान सेनेचे नेर्तुत्व केले...बेचाळीसच आंदोलन थंडावले... पण थंड होतोय तो #सातारा कसला...सातारा धुमसत राहिला...आता आपलं सरकार, आपली न्यायालये, आपली सेना, असा काही बेत करुन #प्रतिसरकरची स्थापना झाली...
गोरगरिबांना त्रास देणाऱ्यांना, जमीन लटणार्यांना, आया बहिणींच्या अब्रूला हात घळणार्यांना पकडून झाडाला उलटे टांगून पायाला पत्र्या ठोकल्या(वेताच्या काठीने चोप दिला)... लोकं सुखावली.
हे काम करण्यासाठी त्याचप्रमाणे शस्त्र घेण्यासाठी व प्रतिसरकार चालवण्यासाठी मिरज पे ट्रेन लुटली, कल्याणचा खजिना धुळ्याजवळ लुटला. प्रतिसरकरचा बोलबाला चर्चिलपर्यंत गेला...इंग्रजांच्या साम्राज्याला साताऱ्यात ग्रहण लागले... युनियन_जॅकचा_सूर्य_साताऱ्यात_मावळला...
पण हे महाराष्ट्रातील त्या वेळच्या गांधी चळवळीतील वरिष्ठ नेत्यांना रुचले नाही...नानांना गुंड म्हणून हिनवले... देश स्वतंत्र झाला...नानांना शेकाप, कम्युनिस्ट असा प्रवास करावा लागला.. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पुन्हा येरवड्याची वारी करावी लागली...संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते...दोन वेळा खासदार होऊनही नाना मात्र साधे होते साधेच राहिले...
आजचे जे स्वातंत्र्य आपण उपभोगतोय ते आपल्याला खूप सहज मिळालेलं नाही...याची जाणीव अशी चरित्र वाचून होते...स्वातंत्र्याच्या यज्ञात हजारो देशभक्तांच्या आयुष्याची होळी व घरादाराची राखरांगोळी झाली...तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य मिळाले....पण आज सर्वत्र परिस्तिथी पाहता...त्या क्रांतीविराना, त्या क्रांतिसिंहांना, त्या क्रांतिसूर्याना काय वाटतं असेल?? हेचि काय फळ मम तपाला...#क्रांतिसिंह नाना पाटील या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला येऊन आपण त्यांना कसे विसरलो?? हा प्रश्न संवेदनशील मनाला पडतो...
क्रांतिसिंह- एक फर्डा वक्ता, द्रष्टा समाजसेक, डाव्या चळवळींचा सेनानी, संयुक्त महाराष्ट्राचा लढवय्या, महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी. त्यांचे लोभस, रांगडे, व्यक्तिमत्व, मातीतून आकारलेले नेतृत्व, मूलखावेगळे कर्तृत्व यांचा शोध घेण्यासाठी, त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा जाऊन घेण्यासाठी वाचा.... #क्रांतिसूर्य
क्रांतिसूर्य- विश्वास पाटील
किंमत- 150 रु
प्रकाशन- मेहता पब्लिकेशन
पृष्ठ संख्या-156

No comments:

Post a Comment